Festival Posters

शेतकऱ्यांवरील या दडपशाहीची किंमत राज्यकर्त्यांना मोजावी लागेल - अजित पवार

Webdunia
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018 (18:01 IST)
दिल्लीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर ज्याप्रकारे पोलिसांकडून बळाचा वापर झाला ते सरकारचे अपयश आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते Ajit Pawarयांनी केली आहे. असले सरकार शेतकऱ्यांवर गोळीबार करते, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडते, सरकार शेतकरीविरोधात लाठीचार्ज करते. हे सरकारंच शेतकरी विरोधात आहे तर यांच्याकडून काय अपेक्षा कराव्यात, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना आधारभूत किंमत नाही, कर्जमाफी नाही. एकीकडे मोठ्या उद्योगपतींना हजारो-कोटींची कर्जमाफी होते. मोठ्या बॅंकेमध्ये त्यांचे कर्ज माफ करण्याकरिता सरकार त्या ठिकाणी मोठी रक्कम देत आहे. त्यातच कोट्याधीश होणारी माणसे आपला पैसा लुबाडून परदेशात पळून जात आहेत व आपले सरकार बघ्याची भूमिका घेतंय. इथे मात्र जो शेतकरी संपूर्ण देशाला अन्न पिकवतो, धान्य पिकवतो, सगळ्यांना जगवतो. अशा या लाखाच्या पोशिंद्यावर हे लाठीचार्ज करतात. या राज्यकर्त्यांना याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

BCCI ने घेतला मोठा निर्णय: मुस्तफिजुर रहमान IPL मधून बाहेर, केकेआर बदली खेळाडू शोधणार

मार्चमध्ये ५०० रुपयांच्या नोटा बंद होणार का? पीआयबीने सत्य उघड केले

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

मुंबईत प्रेयसीने प्रियकराच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केला

नितीन गडकरींनी सासरचे घर पाडले, पत्नीचा धक्कादायक खुलासा

पुढील लेख
Show comments