Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओबीसींचं राजकीय आरक्षण संपण्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार : भाजप

Webdunia
शुक्रवार, 18 जून 2021 (22:45 IST)
ओबीसींचं राजकीय आरक्षण संपण्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे  यांनी केलाय. 26 जूनला राज्य़भर चक्का जाम आंदोलनाचा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिलाय. तसंच ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका होऊ देणार नाही, न्यायालयात दाद मागू असंही पंकजा मुंडेंनी  सांगितले आहे.
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. सुमारे तीन तास ही बैठक चालली. या बैठकीनंतर पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनाची घोषणा केली. महाविकास आघाडीच्या चुकीमुळे ओबीसींचं आरक्षण गेलं आहे. त्यामुळे या सरकारला धडा शिकवण्यासाठी येत्या 26 जून रोजी चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली. भाजप सरकार सत्तेत असताना निर्णयक्षमता होती. योग्य निर्णय घेण्याची आमची नियत होती. त्यामुळे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अध्यादेश काढले. पण या सरकारची मानसिकता तशी नाही. राज्य सरकार ओबीसींची बाजू मांडू शकले नाहीत म्हणून आरक्षण गेलं असा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे.  

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments