Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Amravati :मटण खाऊन आला म्हणून भारत हरला म्हणत भावाचा खून केला

Webdunia
मंगळवार, 21 नोव्हेंबर 2023 (15:18 IST)
मटण खाऊन आल्यामुळे भारत हरला असं म्हणत एका व्यक्तीने आपल्या वडिलांवर आणि लहान भावावर लोखंडी रॉड ने हल्ला केल्याची धक्कादायक घटना अमरावती जवळ अंजनगाव बारी गावांत घडली आहे. या हल्ल्यात लहानभावाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अंकित इंगोले असे या मयत चे नाव आहे. तर वडील रमेश इंगोले हे गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रवीण इंगोलेला अटक केली आहे. 
19 नोव्हेंबर रोजी भारत ऑस्ट्रेलियाचा सामना झाला त्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा  पराभव करत विजेतेपद पटकावले. 
रविवारी आरोपी प्रवीण त्याचा लहान भाऊ अंकित आणि वडील रमेश हे तिघे टीव्हीवर सामना पाहत होते. आरोपीच्या वडिलांनी आणि लहान भावाने रात्री जेवणात मटण खालले आणि जेवण केल्यावर ते हॉल मध्ये आले आणि टीव्ही समोर उभे होते. प्रवीणने मटण खाण्यावरून वडिलांशी वाद घालण्यास सुरु केले. तुम्ही मटण खाऊन आला म्हणून भारत हासामना हरला. असं म्हणत त्याने लोखंडी रॉड ने त्यांच्यावर हल्ला केला.

वडिलांना वाचविण्यासाठी लहानभाऊ मध्ये आला तर प्रवीणने त्याच्या डोक्यावर देखील हल्ला केला. त्याने अंकितला बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. वडील या घटनेत गंभीर जखमी झाले. आरोपीच्या घरात वाद होत असता पाहायला शेजारचे लोक आले असता त्यांना अंकित रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. आणि वडिलांची प्रकृती चिंताजनक होती. लोकांनी  आरोपी प्रवीणला पकडून ठेवले आणि वडिलांना तातडीनं रुग्णालयात नेले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी प्रवीणला ताब्यात घेतलं. पोलिसांनी अंकितचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
 
 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईहून लंडनला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये इमर्जन्सी अलर्ट, विमान हवेत फिरते

पंखे वाले बाबा कोण ? 'लड्डू मुट्या' का होत आहे व्हायल ?

रेल्वे बुकिंग व्यवस्थेत मोठा बदल, आता किती दिवसांपूर्वी तिकीट बुक करता येईल जाणून घ्या

सरफराज-तालिब एनकाउंटर: बहराइच हिंसाचार प्रकरणातील आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: मनोज जरांगे पाटील फॅक्टर किती परिणामकारक ठरणार?

पुढील लेख
Show comments