Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनाच्या धास्तीने अमरावती-पुणे रेल्वे रद्द

Webdunia
बुधवार, 18 मार्च 2020 (13:52 IST)
लातूरहून पुण्याला जाण्यासाठी मंगळवारी व रविवारी सकाळी साडेसहा वाजता सुटणारी अमरावती-पुणे ही रेल्वे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी रद्द करण्यात आली आहे. यामुळे लातूरहून पुण्याला जाणार्‍या प्रवाशांना आता सकाळी रेल्वे मिळणार नाही. ही रेल्वेसेवा पुढच्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. चीनहून आलेल्या कोरोना विषाणूच्या आजाराने भारतातही पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. या आजारावर नियंत्रणासाठी केंद्र व राज्य सरकारने ठोस उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. आजाराचे लोण महाराष्ट्रातही येत आहे. सर्वाधिक रुग्णांची संख्या पुणे येथे असल्याचे दिसून येते. यामुळे पुण्यातील नागरिक गावाकडे स्थलांतरित होऊ लागले आहेत. त्यांच्या येण्याने गावांमध्ये कोरोनाच्या भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रवाशांची संख्या वरचेवर रोडावत चालली आहे. मुंबई-पुण्याहून गावाकडे येणार्‍यांची संख्या वाढत आहे. यामुळे येणार्‍या रेल्वे, बसेस, खासगी प्रवासी वाहतूक यांना मोठी गर्दी होत आहे. सर्वच कार्यालये, रेल्वे सेवा बंद केल्याने व कोरोनाच्या भीतीने ग्रामीण भागातील नागरिक आपले नियोजित दौरे पुढे ढकलत आहेत. कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अमरावती-पुणे ही आठवड्यातून मंगळवारी व रविवारी लातूर स्थानकातून धावणारी रेल्वे सेवा बंद केली आहे.
 
शासनाने 31 मार्चपर्यंत सर्वच शासकीय व निमशासकीय संस्थाने, शाळा-महाविालये, खासगी शिकवण्या, मॉल,स्विगिं पूल आदी ठिकाणे बंद केली आहेत. आठवडी बाजारही भरवण्यास बंदी घातली आहे. सार्वजनिक यात्रा, उत्सव यावरही बंदी आणली आहे. याचाच एक भाग म्हणून अमरावती-पुणे रेल्वेही बंद करण्यात आली आहे. |

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments