Dharma Sangrah

अण्णा हजारे यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Webdunia
सोमवार, 22 जानेवारी 2018 (08:59 IST)

अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत मोदींना पंतप्रधानपदाचा प्रचंड गर्व असल्याची टीका केली. ‘आतापर्यंत मी ३० हून अधिक पत्रे पाठवली. मात्र, पंतप्रधान मोदींनी यातील एकाही पत्राचे उत्तर दिले नाही,’ असे अण्णा म्हणाले.  आटपाडी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. २३ मार्चपासून अण्णा दिल्लीत आंदोलन सुरू करत आहेत. आंदोलनाला जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी जागोजागी जाहीर सभा घेणार आहेत. या वेळी होत असलेले आंदोलन सर्वात मोठे असेल. हा केंद्र सरकारला इशाराच असेल, असा दावाही अण्णांनी केला. लोकपाल आणि लोकायुक्तांची तातडीने नेमणूक करा, शेतकऱ्यांना ५ हजार रुपये पेन्शन द्या आणि शेतीमालास चांगली आधारभूत किंमत जाहीर करा, अशा अण्णांच्या मागण्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

सिंधू आणि सात्विक-चिराग जोडीची शानदार कामगिरी करत मलेशिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

रशियन ड्रोन हल्ल्यांमुळे युक्रेनचे दोन प्रदेश अंधारात बुडाले, घरांमध्ये वीजपुरवठा खंडित

Swami Vivekananda Teachings विवेकानंदांचे हे १० अमूल्य विचार जगाला एक नवी दिशा देऊ शकतात

US Embassy warns India Students अमेरिकन दूतावासाने भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा रद्द आणि हद्दपारीचा कडक इशारा दिला

"माहित नाही की एखादा पुरूष कधी बलात्कार करू शकतो, म्हणून सर्व पुरूषांना तुरुंगात टाकावे का?"

पुढील लेख
Show comments