Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री संत निवृत्तीनाथ मंदिरात होणारे वार्षिक उत्सव

Webdunia
गुरूवार, 24 जून 2021 (23:22 IST)
आषाढीवारी पालखी सोहळा
श्री निवृत्तिनाथ महाराजांचा पालखी सोहळा दरवर्षी पायी दिंडीद्वारे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आणि परत पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर असा होत असतो. या सोहळ्यामध्ये सुमारे ५० ते ६० हजारांच्या संख्येने वारकरी महाराजांच्या पालखी बरोबर प्रवास करीत असतात. हा पालखी सोहळा ज्येष्ठ शुद्ध १४/१५ या दिवशी त्र्यंबकेश्वरहून निघतो आणि आषाढ शु.१० या दिवशी पंढरपूर येथे पोहचतो. त्यानंतर दशमी ते आषाढ शुद्ध १५ पर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपूर येथे श्री निवृत्तिनाथ महाराज मठ (बेलापूर – अंमळनेरकरमठ) प्रदक्षिणारोड या ठिकाणी असतो. पौर्णिमेला परतीचा प्रवास सुरूं होतो व श्रावण शु.३ या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे पोहचतो. या संपूर्ण सोहळ्यामध्ये रथाच्या मागे व पुढे एकूण ५० दिंडया समाविष्ट होतात. त्यांची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था दिंडी प्रमुख करतात. तसेच भोजनाची व्यवस्था प्रत्येक गांवकरी करीत असतात. आता श्री निवृत्तिनाथ महाराज वारकरी भजनी मंडळ यासंस्थेद्वारे रथाच्या पुढील एक क्रमांकाच्या दिंडीचे नियोजन असते. भोजनाची, पाण्याचे टँकर , सामानांसाठी ट्रक अशी व्यवस्था केली जाते. शिवाय संस्थान मार्फतहि पाण्याचे टँकर , सामानासाठी ट्रक अशी व्यवस्था केली जाते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी बजेटला निरुपयोगी म्हटले

LIVE: दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई होणार

दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई होणार! म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार

'पानिपतची तिसरी लढाई मराठ्यांचा पराभव नाही, तर त्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे', फडणवीस विधानसभेत म्हणाले

दुर्गा पूजा पंडालमध्ये भीषण आग, १० वर्षांचा मुलाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments