Marathi Biodata Maker

नरभक्षक बिबट्याचा हल्ला सहावा बळी

Webdunia
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (16:21 IST)

जळगाव येथील चाळीसगाव तालुक्यात पाच जणांचा लागोपाठ बळी बिबट्याने घेतला आहे. आज मंगळवारी पहाटेत्याने पुन्हा हल्ला करत  सहावा बळी घेतला. बिबट्याला ठार मारण्याचे आदेश राज्याच्या वनमंत्र्यांनी दिले आहेत. चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे खुर्द येथे झोपडीत झोपलेल्या वृद्धेवर बिबट्याने हल्ला केला, यामुळे  बिबट्याच्या हल्यातील मयतांची संख्या सहावर पोहोचली आहे. मात्र वन प्रशासन सुस्त दिसत असून फिरण्या पलीकडे कोणतेही काम ते करताना दिसत नाहीत. 

या हल्ल्यात यमुनाबाई तिरमली (७०) महिला ठार झाली.  मंगळवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास ही घटना समोर  आली.  वनविभागा वर ग्रामस्थ संतापले आहेत. यमुनाबाई तिरमली यांच्या झोपडीवजा घरात कुटुंबातील तीन मुलांसह झोपल्या होत्या. त्याचवेळी नरभक्षक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. घटनास्थळापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर तिरमली यांची मान आढळली तर धडाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. राहुल चव्हाण (८), अलका अहिरे (५०), बाळू सोनवणे (२५), दीपाली नारायण जगताप (२५), सुसाबाई धना नाईक (५५)  या सर्वांवर बिबट्याने हल्ला करत ठार केले आहे. या परिसरात नागरिक फार भयभीत झाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

मालेगाव स्फोट प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयाने स्फोटातील चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली

मुंबई: पाणीटंचाईमुळे सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुण्यावर बंदी; आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार

LIVE: खर्गे यांच्या दहशतवादी वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्रात तीव्र उष्णतेचा सामना करण्याची तयारी, सरकारने हवामान बदल आणि वाढत्या तापमानाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मोठे पाऊल उचलले

महाराष्ट्र सरकारने अक्षय तृतीयेच्या दिवशी ३२ बालविवाह यशस्वीरित्या रोखून तत्परता दाखवली

पुढील लेख
Show comments