Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शस्त्र परवाना नुतनीकरणाला आता 5 वर्षांची मुदत : केंद्रीय विधी व न्याय विभागाकडून राजपत्र प्रसिध्द

Webdunia
शनिवार, 3 डिसेंबर 2022 (15:19 IST)
कोल्हापूर :शस्त्र परवाना नुतनीकरणाची मुदत आता 3 वर्षाऐवजी 5 वर्षे करण्यात आली आहे. याबाबतचे राजपत्र नुकतेच केंद्रीय विधी व न्याय विभागाकडून प्रसिध्द करण्यात आले आहे. जिह्यात सुमारे साडेसात हजार शस्त्र परवानाधारक आहेत. नुतनीकरणाच्या मुदतवाढीची अंमलबजावणी या महिन्यापासून होणार आहे. यामुळे परवानाधारकांना दिलासा मिळाला आहे.
 
स्वसंरक्षण, शेतीमध्ये येणार्या जनावरांपासून संरक्षणासाठी, सैन्य दलातून निवृत्त झालेल्या अधिकारी व सैनिकांसाठी शस्त्र परवाना दिला जातो. या परवान्यावर बंदूक, रिव्हॉलवर, पिस्टल अशी शस्त्रे वर्गवारीनिहाय घेता येतात. त्यासाठी जिल्हा दंडाधिकार्यांकडून हा शस्त्र परवाना दिला जातो. त्यानंतर दर तीन वर्षांनी या परवान्याचे नुतनीकरण संबंधित भागातील प्रांताधिकार्यांकडून केले जाते. नुतनीकरण करताना संबंधित शस्त्र परवानाधारकाने नुतनीकरणाचा अर्ज, पोलीसांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, जिल्हा शल्य चिकित्सकांकडील आरोग्य प्रमाणपत्र आदी कागदपत्रे द्यावी लागतात. त्यासोबतच आपल्याकडील शस्त्रही सादर करावे लागते. अशा प्रक्रियेतून शस्त्र परवानाधारकांना जावे लागते. परंतु आता त्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. 3 वर्षांनी नुतनीकरण करण्याच्या शस्त्र परवान्याला आता 5 वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. याबाबतची धोरणात्मक दुरुस्ती केंद्रीय विधी व न्याय विभागाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार नुकतेच राजपत्रही प्रसिध्द करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार या महिन्यापासून कार्यवाही सुरु होणार आहे.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments