Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी हॉटेल चालकांचा पुढाकार

Webdunia
गुरूवार, 25 एप्रिल 2019 (09:54 IST)
बहुतेक हॉटेलमध्ये ग्राहकांनी मागण्याआधीच वेटर ग्लासभर पाणी ठेवतो. अधिक तहान नसल्याने बहुतेक ग्राहक त्यातील अर्धाच ग्लास पाणी पितात. परिणामी, उरलेले अर्धा ग्लास पाणी ओतून द्यावे लागते. अशाप्रकारे मुंबईतील हजारो हॉटेलमध्ये रोज लाखो लीटर पाण्याची नासाडी होती. हीच नासाडी टाळण्याचे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीने आहार संघटनेला केले. या आवाहनाला प्रतिसाद देत आहार संघटनेने त्यांच्या 8 हजार सदस्यांना पाणी बचतीच्या उपक्रमात सामील होण्यास सांगितले आहे. त्यात आहारच्या सदस्य हॉटेलमध्ये पाणी वाचवण्याचे पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. तसेच ग्राहकांना सुरूवातीला अर्धा ग्लास पाणी देत अधिक पाणी हवे आहे का? याची विचारणा वेटर करणार आहेत.
 
पाणी बचतीसाठी आकर्षक स्लोगन तयार करून विविध चित्रांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोस्टर तयार करण्याचे काम जे जे कला महाविद्यालयातील प्रथम वर्षात प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी केले आहे. संबंधित पोस्टर्स हॉटेलच्या दर्शनीभागात लावण्यात येत आहेत. तूर्तास दादर, लोअर परळ, सायन, किंग्ज सर्कल येथील हॉटेलमध्ये हे पोस्टर्स दिसत आहेत. लवकरच मुंबईतील बहुतेक हॉटेलमध्ये हे पोस्टर्स लावणार असल्याचे आहारने स्पष्ट केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबर बाबत मोठे विधान केले

पूर्व वैमनस्यातून नाशिकमध्ये वृद्धाची हत्या,2 आरोपींना अटक

IPL 2025: मुंबई इंडियन्समध्ये वेगवान गोलंदाज लिझाड विल्यम्सची जागा घेणार हा खेळाडू

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जीएसटी दर कमी करण्याचे संकेत दिले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबर बाबत मोठे विधान केले म्हणाले-

पुढील लेख
Show comments