Festival Posters

डॉ. आंबेडकर यांच्या पुतळयाच्या उंचीवरून आता वाद सुरु

Webdunia
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018 (16:53 IST)
महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या उंचीवरून जोरदार वाद झाला होता. आता असाच वाद देशाचे संविधान करते बहुजनाचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्यावरून जोरदार वाद सुरु झाला आहे. इंदू मीलमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्मारकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बाबत चे वृत्त एका मराठी वृत्त वाहिनीने दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची उंची 350 फूट ठेवण्याची होती मात्र नवीन आराखड्यानुसार पुतळ्याची उंची 251 फुट, तर खालचा चौथरा 99 फूट होणार असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बहुजन आंबेडकरी समाजात याप्रकरणी मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. याआधी मुख्यमंत्र्यांच्या भाषणातूनही बाबासाहेबांचे भव्यदिव्य स्मारक असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. स्मारकाच्या आढावा बैठकीत सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी याप्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे मोठा उद्भवण्याची शक्यता आहे. सरकार यावर काय भूमिका घेतं आणि काय निर्णय देतं याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.  मात्र राज ठाकरे यांनी दोन्ही पुतळ्यांना विरोध दर्शवला असून छत्रपती शिवाजी राजे यांचे सर्व किल्ले दुरुस्त करा आणि डॉ. आंबेडकर यांच्या नावाने जगप्रसिद्ध ब्रिटीश लायब्ररी सारखी निर्माण करा हेच खरे स्मारक असेल असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

अशोक खरात प्रकरणातील मुख्य साक्षीदार जितेंद्र शेळके यांच्या मृत्यू; सुषमा अंधारे म्हणाल्या, "या अपघातात षडयंत्राचा वास येत आहे"

"मला आणि पंतप्रधानांना तर बायकोच नाही..."हे काय बोलून गेले राहुल गांधी

LIVE: अशोक खरात प्रकरणातील प्रमुख साक्षीदार जितेंद्र शेळके यांचे रस्ते अपघातात निधन

अपघात की षडयंत्र? अशोक खरात प्रकरणात प्रमुख साक्षीदार जितेंद्र शेळके यांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू

महाराष्ट्रात २३ जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट तर सांगली-सोलापूरमध्ये पावसाचा इशारा; मंत्री गिरीश महाजन म्हणाले.....

पुढील लेख
Show comments