Marathi Biodata Maker

कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष यांनी त्यांच्या २०५ एकर माळरान जमीनित केली बांबूची लागवड

Webdunia
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018 (10:33 IST)
लातूर येथे राज्यमंत्री कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी त्यांच्या २०५ एकर माळरान जमीनित बांबूची लागवड केली. कमी पाण्यात बांबुची लागवड ऊसापेक्षाही परवड्ते असं पाशा पटेल म्हणतात.बांबूच्या लागवडीमुळे वनक्षेत्र वाढते तसेच या माध्यमातून शेतकर्‍यांना शाश्‍वत उत्पन्न मिळू शकते. बांबूपासून अनेक वस्तू तयार करता येत असल्याने रोजगारही मिळतो. मराठवाड्यात आता बांबूची लागवड सुरू झाली असून या माध्यमातून आगामी कांही वर्षात मराठवाड्याचे चित्र पालटणार असल्याचे मत महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे कार्यकारी संचालक थंगम साईकुमार रेड्डी यांनी व्यक्त केले.
 
फिनिक्स फाऊंडेशन संस्था लातूर व महाराष्ट्र वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने लोदगा येथे ङ्गिनिक्स फाऊंडेशनच्या जागेत ५१ हजार बांबूच्या झाडांचे रोपण मंगळवारी (दि. ३१) करण्यात आले. वृक्षारोपणानंतर आयोजित कार्यक्रमात रेड्डी बोलत होते. महाराष्ट्र राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विभागीय वन अधिकारी आर. के. सातेलीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, उस्मानाबादचे सहाय्यक वन संरक्षक आर. जी. मुद्दमवार, गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवान कापसे, अमृत पॅर्टनचे जनक अमृतराव देशमुख, प्रयोगशील शेतकरी राजशेखर पाटील, कृषीमुल्य आयोगाचे सदस्य अचुत गंगणे, उपविभागीय अधिकारी चाऊस यांची उपस्थिती होती. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

जंगलातील आगी रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर- वनमंत्री गणेश नाईक विधानसभेत म्हणाले

अशोक चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांना मोठी जबाबदारी, मैत्री गटांचे नेतृत्व करणार

परिचारिका आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सहा महिन्यांच्या बाळाचे बोट कापले गेले; रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल

LIVE: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा पिवळा इशारा जारी

"मदरसे बंद करा, ते दहशतवाद्यांना जन्म देतात," मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान

पुढील लेख
Show comments