Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेळगाव केंद्रशासित प्रदेश करावा -संजय राऊत

Webdunia
शनिवार, 9 जुलै 2022 (15:08 IST)
शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत  हे नाशिक दौऱ्यावर आहे. नाशिक जिल्ह्यातील दोन आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहे. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी संजय राऊत हे पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. ‘त्यांचे हायकमांड दिल्लीत बसलेले आहे, पण शिवसेनेचे हाय कमांड मातोश्रीवर आहे.’असा टोला संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
 
एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले, “ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, पण दिल्लीत हाय कमांडच्या भेटीला गेलेले आहेत. शिवसेनेचे हाय कमांड मातोश्रीवर आहे. कुणी म्हणत असेल, हे शिवसेनेचे सरकार आहे, त्यांनी लक्षात घ्यावे की शिवसेनेचे हाय कमांड मातोश्री आहे, दिल्ली नाही.”असा हल्लाबोल राऊत यांनी केला
 
बेळगाव केंद्रशासित प्रदेश करावा
संजय राऊत म्हणाले की, “सीमा भागात पुन्हा अत्याचार सुरू झाला आहे. ठाकरे सरकार गेल्यापासून सीमा भागात त्रास वाढला आहे. तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचे आहेत. केंद्रात आणि कर्नाटकात दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे, त्यामुळे बेळगावसह सीमा भागातील मराठी लोकांवर अत्याचार होत आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे तोपर्यंत, हा संपूर्ण भाग केंद्रशासित करावा. तसेच अशी भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे मांडावी.”अशी मागणी संजय राऊत यांनी केली. या संदर्भात निर्णय घेऊन महाराष्ट्रात यावे, असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही-देवेंद्र फडणवीस

राज्यातील एकही मराठी शाळा बंद होणार नाही, फडणवीसांनी दिले आश्वासन

मुंबईत बस ने प्रवास करणे पुन्हा महागणार, बेस्ट बसचे भाडे वाढणार!

अजित पवार यांचा कंत्राटदारांवर कोणतेही काम न करता बिले सादर केल्याचा आरोप

लाडक्या बहिणींसाठी योजनेतील नियम बदलणार, काय असणार नवे नियम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments