Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

Webdunia
मंगळवार, 1 ऑगस्ट 2023 (07:28 IST)
Below average rainfall in August ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन महिने मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला. पण पुढील दोन महिने सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव वाढत जाण्याचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात ऑगस्ट महिना कोरडा जाणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. ऑगस्टचा पहिला आठवडा सोडला तर राज्यात पाऊस कोसळण्याची शक्यता कमी आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. महाराष्ट्रात ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. अल निनोचा प्रभाव असला तरी आयओडी पॉझिटिव्ह राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयओडी न्युट्रल आणि पॉझिटिव्हकडे सरकत असल्याने दोन महिन्यात चांगला पाऊस झाला.
 
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २ ऑगस्ट रोजी विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. ३ ऑगस्ट रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिमुसळधारेचा अंदाज आहे. ४ ऑगस्ट रोजी मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना आणि परभणीत विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

'महिलांना महिन्याला 1500 रुपये', 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही नवी योजना काय आहे?

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान, संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची लोखंडी रॉडने वार करून हत्या

तेलंगणा मध्ये काचेच्या कारखान्यात स्फोट, पाच ठार, 15 जखमी

IND vs SA Final Rules: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ICC फायनलचे नवीन नियम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या टॉयलेटमध्ये पेटवली सिगारेट, स्मोक सेन्सर सक्रिय, गुन्हा दाखल

IND W vs SA W: शेफाली वर्मा, कसोटीत सर्वात जलद द्विशतक झळकावणारी महिला खेळाडू बनली,मंधानासोबत विक्रमी केली भागीदारी

Bomb Threat: विस्ताराच्या केरळ-मुंबई विमानात बॉम्बची धमकी

पुणे बार प्रकरण: पुणे बार प्रकरणात नायजेरियन नागरिकासह तिघांना अटक

श्रीलंका पोलिसांनी 60 भारतीय नागरिकांना अटक केली, कारण जाणून घ्या

पुढील लेख
Show comments