Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारत जोडो यात्रेमध्ये शिवसेनाही सहभागी होणार, भाई जगताप यांची माहीती

Webdunia
गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (21:29 IST)
काँग्रेस नेते राहुल गांधी  यांच्या नेतृत्त्वाखाली कन्याकुमारी ते काश्मिर  भारत जोडो यात्रेची सुरुवात झाली आहे. मुंबईत आयोजन करण्यात येणाऱ्या काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेमध्ये बहुतांश राजकीय पक्ष सहभागी होणार आहे. आप आणि एमआयएम वगळता इतर जवळपास सर्व राजकीय पक्ष या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहे.
 
मुंबईत आयोजन करण्यात आलेल्या या भारत जोडो यात्रेमध्ये शिवसेनाही सहभागी होणार आहे. शिवसेना पक्षाशी याबाबत चर्चा झाली असून शिवसेनेकडून मनिषा कायंदे या शिवसेनेच्या प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली.
 
दरम्यान भारत जोडो यात्रेला शिवसेनेने सहकार्य केल्यास दसरा मेळाव्याला काँग्रेस मदत करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असून याबाबत प्रश्न विचारला असता अशी काही एक्सचेंज ऑफर नाही. हे आंदोलन हे देशहितासाठी आहे आणि दसरा मेळावा हे शिवसेनचे बलस्थान आहे असे उत्तर भाई जगताप यांनी दिलं.
 
तर राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, समाजवादी पक्ष, RPI, रिपब्लिकन पक्ष गवई गट, शेकाप पक्ष भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहे. मुंबई महापालिकेच्या 236 वॉर्डमध्ये आणि संपूर्ण भारतात चार महिन्यात भारत जोडो, नफरत छोडो मोहीम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणार असल्याचेही काँग्रेसकडून सांगण्यात आले. गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला ऑगस्ट क्रांती मैदानातून भारत जोडो यात्रा निघणार असून विविध ठिकाणी फिरून यात्रा मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्याजवळ संपणार आहे. मुंबईतील ही यात्रा एका दिवसाची असणार आहे. याशिवाय विविध सामाजिक संस्थाही भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.

Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments