Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईला पाणी पुरवठा करणारे भातसा धरण ओव्हरफ्लो

Bhatsa Dam overflows to supply water to Mumbai
Webdunia
शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (22:30 IST)
शहापुर तालुक्यातील मुंबईला पाणी पुरवठा करणारे भातसा धरण शनिवारी ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटर उघडण्यात आले असून १२४६.२६ क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील तानसा, मोडकसागर पाठोपाठ भातसा हे धरण देखील आता तुडुंब भरले आहे. शनिवारी ठिक दुपारी २.३० वाजता धरणाचे पाच पैकी धरण गेट क्रमांक १ आणि ५ हे दोन दरवाजे तातडीने उघडले असून भातसा नदी किनाऱ्या लगतच्या साजीवली, सरलांबे, तुते, सावरशेत, सापगाव, खुटघर, खुटाडी अशा अन्य गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे जलसंपदा विभागाच्या भातसा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी मााहिती देताना सांंगितले.
 
मुंबईला पाणी पुरवठा करण्याची महत्वाची जबाबदारी भातसा धरणावर आहे. प्रतिदिन २००० एमएलडी पाणी भातसा धरणातून मुंबई आणि ठाणे महानगराला दिले जाते. या धरणाची लांबी ९५९ मीटर असून तळपायापासून उंची ८९ मीटर आहे. तसेच एकूण जलसंचय ९७६.१० दशलक्षघन मीटर आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्र ३८८.५० चौरस किलोमीटर आहे.
 
भातसा धरणाला जोडलेला उजवा तिर कालवा ६७ किलोमीटर आहे. तर डावा कालवा ५० किलोमीटर आहे. भातसा धरणाच्या पाण्यावरती जलविद्युत केंद्राद्वारे १५ मेगावॅट एवढी वीजनिर्मिती केली जाते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: ठाकरे गटाला आमंत्रित केल्याबद्दल मनसेवर भाजप नाराज

"कोणताही निर्णय काळजीपूर्वक विचार करून घेतला पाहिजे" पाकिस्तान गप्प बसणार नाही- नेते शरद पवार

वीर सावरकरांविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पुण्यातील न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

कैलास मानसरोवर यात्रा जून ते ऑगस्टपर्यंत चालणार

पुढील लेख
Show comments