Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईला पाणीपुरवठा करणारा भातसा तलाव भरला

Webdunia
मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (15:33 IST)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडक सागर, तानसा, तुळशी हे तीन तलाव १३ – १६ जुलै कालावधीत भरून वाहू लागले होते. तर विहार तलाव हा ११ ऑगस्टला भरून वाहू लागला होता. भातसा तलाव मंगळवार १३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत १०० टक्के भरला आहे. विशेष म्हणजे अप्पर वैतरणा तलावात सध्या ९८.७३ टक्के पाणीसाठा जमा झाला असून या तलावांत पुढील २४ किंवा ४८ तासात चांगला पाऊस पडल्यास हा तलावही कोणत्याही क्षणी भरून वाहू लागेल.
 
त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एकूण पाच तलाव आता भरले असून सहावा अप्पर वैतरणा तलावही भरण्याच्या मार्गावर आहे. उरलेला फक्त एक तलाव म्हणजे मध्य वैतरणा तलावांत सध्या ९६.४५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला आता पुढील पावसाळ्यापर्यंत पाण्याचे टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments