Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेते दिलीपकुमारांना न्याय नाही : सर्वसामान्यांनी काय अपेक्षा करावी : भुजबळांची सरकारवर टीका

Webdunia
मुंबई :सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते पद्मविभूषित दिलीप कुमार आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांचा बंगला मुंबईतील भूमाफियाकडून बळकावण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे त्यांनी दिलीप कुमार यांच्या अकाऊंट वरून प्रधानमंत्र्याकडे ट्वीट करून या अन्यायाबाबत दाद मागितली आहे. दिलीप कुमार आणि सायरा बानो हे हिंदी चित्रपट क्षेत्रातील अतिशय नामांकित आणि आदरणीय तसेच वयोवृद्ध व्यक्तिमत्व आहे. मुंबईतील भूमाफियाकडून होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे तक्रार केल्याचा त्यांनी ट्वीटमध्ये उल्लेख केला आहे.
 
परंतु त्यांच्या तक्रारीची दखल घेतली न गेल्यामुळे त्यांना थेट पंतप्रधानांकडे दाद मागावी लागली ही अतिशय दुर्देवी गोष्ट आहे. यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती खालावली आहे हे दिसून येते. सुप्रसिद्ध व्यक्तींच्या मुलभूत अधिकारांवर जर अशा प्रकारे गदा येत असेल तर राज्यातील सर्वसामान्य जनतेने सरकारकडून काय अपेक्षा करावी ? अशी टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर केली आहे. 

संबंधित माहिती

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

पुढील लेख
Show comments