Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्य सरकारचा मोठा निर्णय! इतर मागास प्रवर्गातील ‘या’ चार समुदायासाठी महामंडळांची निर्मिती

Webdunia
गुरूवार, 10 ऑगस्ट 2023 (08:29 IST)
Big decision of the state government राज्य सरकारने आज  इतर मागास प्रवर्गातील तीन समुदायांसाठी स्वतंत्र महामंडळांची निर्मिती केली. वीरशैव लिंगायत, वडार, रामोशी व गुरव समाजासाठी स्वतंत्र महामंडळांची निर्मिती करण्यात आली आहे. याबाबत सरकारने आज शासन निर्णय जाहीर केला आहे. या महामंडळांच्या निर्मितीबाबत तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ संकल्पीय भाषणात घोषणा केली होती. मात्र, हा निर्णय आगामी निवडणुकांमध्ये इतर मागास प्रवर्गातील मतांना आपल्याकडे वळण्यासाठी घेतला असल्याची चर्चा सुरू आहे.
 
वीरशैव लिंगायत, वडार, रामोशी आणि गुरव समाजासाठी स्वतंत्र महामंडळांची निर्मिती करण्यात आली आहे. रामोशी, वीरशैव लिंगायत, वडार, गुरव समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र उपकंपन्यांची स्थापना करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.
 
दरम्यान चारही समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळाची रचनादेखील जाहीर करण्यात आली आहे.
 
बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना आदी योजनांचा फायदा मिळणार आहे.
 
 समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने, साधनसामुग्री, व्यवस्थापकीय साधने पुरवणे, कृषी उत्पादने, वस्तू, साहित्य आदी आवश्यक गोष्टींचा पुरवठा करणे. समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे आणि त्यांना चालना देणे.  योजनासाठी अहवाल तयार करणे. संबंधित महामंडळाच्या धर्तीवर शासनाने मंजूरी दिलेल्या योजना राबवणे आदि जबाबदाऱ्या संबंधित महामंडळांना पार पाडाव्या लागणार आहेत.
 
महामंडळाच्यावतीने देण्यात आलेली कर्जेही वसूल करण्याकडे महामंडळांना लक्ष द्यावे लागणार आहे.
 
कोणत्या समाजासाठी कोणते महामंडळ?
 
    वीरशैव-लिंगायत समाजासाठी ‘जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन
    वडार समाजासाठी ‘पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन
    गुरव समाजासाठी ‘संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ’ची रचना
    रामोशी समाजासाठी ‘राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन
 
निधी आणि पदनिर्मिती मंजूर
 
चारही महामंडळ सुरु करण्यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.  महामंडळ तात्काळ सुरु करण्यासाठी  शासनाकडून पद निर्मितीलाही हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुंबईचा गोखले ब्रिज झाला तयार, BMC सुधारली चूक ज्यावर उठला होता विनोद

Sensex : शेअर बाजारात सेन्सेक्सने पहिल्यांदा 80 हजारांचा टप्पा पार केला, निफ्टी 24300 च्या जवळ

महाराष्ट्र : प्रत्येक महिन्याला शेतकरी करीत आहे आत्महत्या, या वर्षी 1046 शेतकऱ्यांनी दिले आपले प्राण

लोन देण्याच्या नावावर फसवणूक, 2 कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

इंदापूरजवळ कारचे टायर फुटून अपघातात 5 जण ठार

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रामध्ये 'लाडकी बहीण योजना' लाभार्थी महिलांचे वाढवले वय

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जाची मुदतवाढ 31 ऑगस्ट पर्यंत -अजित पवार

मांढरदेवी ते हाथरस : धार्मिक कार्यक्रमातल्या चेंगराचेंगरीच्या घटनांचा असा आहे हृदयद्रावक इतिहास

हाथरस चेंगराचेंगरी : 'सत्संगानंतर लोक भोले बाबांच्या पायाची धूळ घ्यायला गेले आणि गोंधळ उडाला'

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक : 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात, 'ही' निवडणूक नेमकी होते कशी?

पुढील लेख
Show comments