Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑनलाईन परीक्षांचा मार्ग कायम स्वरूपाचा असल्याचा गैरसमज चुकीचा : उदय सामंत

Webdunia
मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (15:33 IST)
कोरोना काळात ऑनलाईन परीक्षा घ्याव्या लागल्या. आता हळूहळू आपण ऑफलाईन परीक्षांकडे आले पाहिजे. ऑनलाईन परीक्षा कायमस्वरूपीचा असल्याचा गैरसमज साफ चुकीचा आहे.
 कोविड १९ मुळे शाळा, महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोरोना काळात ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या.
पण आता कोविड १९ चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा, महाविद्यालये हळूहळू पूर्वपदावर येयला सुरुवात झाली आहे. ऑनलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना जास्त गुण देण्याची भूमिका राज्य शासनाने कधीच घेतली नव्हती.
कोरोना काळात ऑनलाईन परीक्षा घ्याव्या लागल्या. आता हळूहळू आपण ऑफलाईन परीक्षांकडे आले पाहिजे. ऑनलाईन परीक्षा कायमस्वरूपीचा असल्याचा गैरसमज साफ चुकीचा आहे.
असे राज्याचे उसाचं व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हंटले आहे. या शैक्षणिक वर्षाच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होतील असे दिसत आहे. शिक्षण मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अंदाज वर्तवला जात आहे.
ऑनलाईन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या अडचणी कमी होतील असे वाटत आहे.
विद्यार्थी आणि पालकांची अशी मागणी आहे की, महाविद्यालयांबरोबरच शाळांच्याही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच व्हाव्यात. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११९ व्या पदवी प्रदान समारंभावेळी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील कोरोना चा अंदाज घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी म्हंटले आहे.
 

संबंधित माहिती

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट

पुढील लेख
Show comments