Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नव्या वर्षात राज्यात भाजप सरकार येणार : नारायण राणे

Webdunia
मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (08:04 IST)
महाराष्ट्रात नव्या वर्षात भाजपचे सरकार येईल या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची रि ओढत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ते काहीतरी अंदाज घेऊनच बोलले असून बोलल खर होईल अशी पुष्टी जोडत तसे झाल्यास तुमच्या तोंडात साखर पडो असे राणे म्हणाले.सावंतवाडीत भाजपच्या बैठकी नंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
रत्नागिरीत जिल्हा बँक निवडणुकीत झालेला पराभव हा धक्का आहे का असे विचारताच राणे यांनी आम्ही याला धक्का मानत नाही. मीच सर्वाना धक्के देत असल्याचे राणे यांनी सागितले.
एसटीच्या संपाला भाजपचा पाठींबा आहे. मात्र सरकारने आता काय तो निर्णय घेतला पाहिजे. ४० आत्महत्या होईपर्यंत सरकार काय करत होते असा सवाल करत राणे म्हणाले एसटी कर्मचार्‍यांरी आंदोलना बाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील असेही राणे म्हणाले.
महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत एसटीचा विषय येतो. एसटीचा एवढे दिवस संप सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या घरची परिस्थिती भयावह आहे. असं असताना राज्य सरकार हा प्रश्न खेळवतंय या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय. त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हे सरकार गांभीर्याने घेत नाही. केंद्र सरकारने सरळ महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावेत. हा प्रश्न त्वरित मिटववा, अन्यथा राज्यपालांकडे आम्ही हे अधिकार देऊ वगैरे आदेश केंद्राने द्यावेत. मी स्वतः गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलेन. यातून मार्ग लवकरच काढावा आणि कर्मचाऱ्यांना वाचवावं एवढ मी सांगेन, असं नारायण राणे म्हणाले. तसेच राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशीसुद्धा कर्मचाऱ्यांच्या हितासाठी बोलेन, असेदेखील त्यांनी सांगितले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का, साळवी यांच्यानंतर जितेंद्र जनावळेंचा राजीनामा

LIVE: रणबीर इलाहाबादियाला फटकारल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे गटातील २० आमदारांची सुरक्षा काढून घेतली

मनू भाकरने बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार जिंकला

नवी मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी जोडप्याला त्यांच्या मुलासह अटक

पुढील लेख
Show comments