Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बीड अ‍ॅसिड हल्ल्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांची सरकारवर टीका

Webdunia
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020 (16:08 IST)
हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा गळा आता कुणी धरला आहे? असा सवाल करत निलेश राणे यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. बीड अ‍ॅसिड हल्ल्याच्या घटनेचा राज्यभरात निषेध करण्यात येत आहे. भाजपने या घटनेवरुन राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.
 
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बीड येथे एका तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जळल्याची घटना घडली. या घटनेचा निषेध करताना निलेश राणे राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “बीडमध्ये एका २२ वर्षीय तरुणीला अ‍ॅसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत,” असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments