Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुरांच्या गोठ्याला आग; शर्यतीला पळणारे ४ बैल होरपळून ठार

Webdunia
सोमवार, 27 मार्च 2023 (21:56 IST)
महाड (जि. रायगड) तालुक्यातील वहूर या गावात भर वस्तीत रविवारी मध्य रात्री गुरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत गोठा जळून खाक झाला, त्याच बरोबर त्या मध्ये बांधलेले शर्यती साठी वापरले जाणारे ४ बैल होरपळून जागीच ठार झाले. या दुर्घटनेमध्ये बैल मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
 
महाड (जि. रायगड) तालुक्यातील वहूर गावातील झटाम मोहल्ल्यात राहणाऱ्या रफीक मोहमद सईद झटाम यांच्या राहत्या घराच्या शेजारी असलेल्या गुरांच्या गोठ्याला रविवारी मध्यरात्री १ च्या सुमारास अचानक आग लागली. याआधी मध्ये संपूर्ण गोठा जळून खाक झाला.आगीची तीव्रता एवढी भयानक होती की गोठ्या मध्ये शर्यती साठी वापरले जाणारे चार बैल बांधलेले होते त्यांचा होडपळून जागीच मृत्यू झाला. या चार बैलांमध्ये शर्यती साठी एकजोडी समुद्र किनारी धावणारी होती तर दुसरी जोडी माती बंदरामध्ये धावणारी होती. मालकांने एक जोडी कर्नाटक मधून खरेदी केली होती तर एक जोडी अलिबाग तालुक्यातून. या चार बैलांची किंमत मालकाच्या सांगण्या वरून सुमारे १० लाख रुपये इतकी होती. आगी मध्ये बैल गोठा आणि इतर झालेले नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून सुमारे १४ लाख रुपये यांचे नुकसान झाले. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments