Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यातल्या प्रसिद्ध गणपती मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवून नेली

Webdunia
गुरूवार, 28 नोव्हेंबर 2019 (16:31 IST)
पुण्यातल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या गणेश मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवून नेली. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आणि विश्रामबाग व फरासखाना अशा दोन मुख्य पोलीस ठाण्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या ऐतिहासिक गणपती मंदिरात २६ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे ३ वाजून ३१ मिनिटांनी दोन अज्ञात चोरट्यांनी गणपती मंदिराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून दान पेटी चोरून नेली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असल्याची माहिती ट्रस्टचे कायदा सल्लागार अॅड. मिलिंद पवार यांनी दिली.

गणपती मंदिरात स्टीलची असलेली दोन फूट आकाराची दानपेटी अनेक वर्षांपासून ठेवलेली आहे. सदरची दानपेटी दरवर्षी गणेशोत्सवात पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशीच सर्व विश्वस्तांसमोर उघडली जाते. २६ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या पहाटे २.३१ वाजता दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून थेट दानपेटीच चोरून नेली आहे. सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार स्पष्टपणे दिसत आहे. या प्रकरणी ट्रस्टचे सचिव दिलीप आडकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन उडवून देण्याच्या धमक्या आल्या होत्या. देशातील पहिला सार्वजनिक गणपती अशी ख्याती आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाला सलाम केला, बदलापूरमध्ये विकास योजना जाहीर केल्या

LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली

नेपाळी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर ५ जणांना अटक

देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिला इशारा, बैठकीपूर्वी अजेंडा लीक झाल्याने मुख्यमंत्री संतापले

शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या स्थापनेवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- यात काहीही चुकीचे नाही

पुढील लेख
Show comments