Dharma Sangrah

पार्थ पवार यांना खरच शरद पवार यांना निवडून आणायचे होते का ? - भाजपा नेते चंद्रकांत पाटील

Webdunia
शनिवार, 13 जुलै 2019 (16:03 IST)
जेष्ठ नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पार्थ पवार यांना खरच निवडून आणायचे होते का ? तर मग त्यांनी पार्थला बारामतीतून का उभे केले नाही ? असा प्रश्न भाजप नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. पाटील यांनी महाबळेश्वर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संबोधित केल आहे, यावेळी त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. पवारांना त्यांच्या पक्षात घराणेशाही चालवायची आहे. म्हणून त्यांनी बारामतीतून स्वत:ची मुलगी सुप्रिया सुळे यांना पुन्यांहा उमेदवारी दिली होती असे पाटील म्हणाले आहेत.
 
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे या बारामतीतून निवडून आल्या आहेत, तर मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचा पराभवाला सामोरे जावे लागले आहे, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला.
 
या लागलेल्या निकालावरून पाटील यांनी पवारांवरच निशाणा साधला आहे. पार्थ यांची ही पहिलीच निवडणूक होती, मात्र सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी निवडणुका लढल्या, शरद पवारांना जर पार्थ पवारला निवडून आणायचं होत, तर त्यांनी पवारांचा हुकमी असलेला बारामती मतदारसंघातून उमेदवारी दिली असती. मात्र त्यांनी  केलं नाही. त्यांनी स्वत:ची मुलगी सुप्रिया सुळेंना बारामतीतून तिकीट दिलं आणि पार्थ पवारांना मावळमधून लढण्यास सांगितलं” असं चंद्रकांत पाटील यांनी नमूद केल आहे. या टीकेमुळे आता पुन्हा नवीन वादाला सुरुवात होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

जंगलातील आगी रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर- वनमंत्री गणेश नाईक विधानसभेत म्हणाले

अशोक चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांना मोठी जबाबदारी, मैत्री गटांचे नेतृत्व करणार

परिचारिका आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सहा महिन्यांच्या बाळाचे बोट कापले गेले; रुग्णालय व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल

LIVE: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा पिवळा इशारा जारी

"मदरसे बंद करा, ते दहशतवाद्यांना जन्म देतात," मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान

पुढील लेख
Show comments