Dharma Sangrah

पार्थ पवार यांना खरच शरद पवार यांना निवडून आणायचे होते का ? - भाजपा नेते चंद्रकांत पाटील

Webdunia
शनिवार, 13 जुलै 2019 (16:03 IST)
जेष्ठ नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पार्थ पवार यांना खरच निवडून आणायचे होते का ? तर मग त्यांनी पार्थला बारामतीतून का उभे केले नाही ? असा प्रश्न भाजप नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. पाटील यांनी महाबळेश्वर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात संबोधित केल आहे, यावेळी त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. पवारांना त्यांच्या पक्षात घराणेशाही चालवायची आहे. म्हणून त्यांनी बारामतीतून स्वत:ची मुलगी सुप्रिया सुळे यांना पुन्यांहा उमेदवारी दिली होती असे पाटील म्हणाले आहेत.
 
लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे या बारामतीतून निवडून आल्या आहेत, तर मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचा पराभवाला सामोरे जावे लागले आहे, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला.
 
या लागलेल्या निकालावरून पाटील यांनी पवारांवरच निशाणा साधला आहे. पार्थ यांची ही पहिलीच निवडणूक होती, मात्र सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी निवडणुका लढल्या, शरद पवारांना जर पार्थ पवारला निवडून आणायचं होत, तर त्यांनी पवारांचा हुकमी असलेला बारामती मतदारसंघातून उमेदवारी दिली असती. मात्र त्यांनी  केलं नाही. त्यांनी स्वत:ची मुलगी सुप्रिया सुळेंना बारामतीतून तिकीट दिलं आणि पार्थ पवारांना मावळमधून लढण्यास सांगितलं” असं चंद्रकांत पाटील यांनी नमूद केल आहे. या टीकेमुळे आता पुन्हा नवीन वादाला सुरुवात होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

“आर्थिक वर्ष २०२५-२६'' दरम्यान जागतिक आव्हानांना सामोरे जावे लागले; पण भारताने आपली आर्थिक गती कायम राखली आणि या काळात रिलायन्सची वाढही सुरू राहिली-मुकेश डी. अंबानी

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांची विभागणी

रिलायन्स रिटेल एआय (AI) आणि किमतींवर लक्ष केंद्रित करणार, मोठ्या प्रमाणाचे मूल्यात रूपांतर करणार-ईशा अंबानी

जिओ एआय युगाचे डिजिटल प्रवेशद्वार बनेल-आकाश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ आणि चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले

पुढील लेख
Show comments