rashifal-2026

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून आदित्य ठाकरे आणि नारायण राणेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी

Webdunia
बुधवार, 28 ऑगस्ट 2024 (15:16 IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळण्याचे प्रकरण आता जोर धरत आहे. विरोधक यावरून राज्य सरकारवर टीका करत आहे. बुधवारी या वरून शिवसेना युबीटीचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजपचे नेते नारायण राणेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही पक्ष नेत्यांचे समर्थक सिंधुदुर्गात पुतळा पडला त्या ठिकाणी पोहोचले तिथे दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. 

बुधवारी आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली आणि पुतळा पडल्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्याच वेळी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे , निलेश राणे आपल्या समर्थकांसह गडावर पोहोचले. आणि आदित्य ठाकरेंना गडावर प्रवेश देण्यावरून पोलिसांशी वाद करू लागले. काही वेळातच दोन्ही पक्ष नेत्यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. या प्राशितीवर पोलिसांनी अथक प्रयत्नाने नियंत्रण मिळवले. 
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुतळा कोसळल्यावरून शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, वाऱ्यामुळे पुतळा पडल्याचा मुख्यमंत्रीचा दावा मूर्खपणाचा आहे. महायुती सरकार मध्ये भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी निषेध मोर्चा 1 सप्टेंबर रोजी मुंबईत काढणार आहे. 
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

International Animal Rights Day 2025 : आंतरराष्ट्रीय प्राणी हक्क दिन

World Human Rights Day 2025 जागतिक मानवी हक्क दिन

Indigo Crisis इंडिगोचे संकट नवव्या दिवशीही कायम, दिल्ली-मुंबई विमानतळावर उड्डाणे रद्द

गर्दीच्या वेळी रेल्वेच्या दाराजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नाही, मुंबई उच्च न्यायालयाने भरपाई मान्य केली

मुंबईहून उत्तर प्रदेश-बिहार मार्गावर नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी; काँग्रेस नेत्याने रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहले

पुढील लेख
Show comments