Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'सीएम टू पीएम' शेतकरी आसुड यात्रा गुजरात पोलिसांनी अडविली

Webdunia
गुरूवार, 20 एप्रिल 2017 (19:52 IST)
शेतीमालाला उत्पादन खर्च+50% नफा, शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती,विधवा-अपंगांना दरमहा 5000/-मानधन द्या या प्रमुख मागण्यासाठी नागपूर येथून महात्मा फुले जयंतीदिनी 11 एप्रिल 2017 रोजी सुरु केलेली शेतकरी आसुड याञा गुजरातमध्ये प्रवेश करताच 20 एप्रिल रोजी सकाळी 11 वा.पोलिसांनी अडविली.
 
बळसाणे जि.धुळे येथे सकाळी सभा झाली.नवापूर जि.नंदूरबार येथे महाराष्ट्र पोलिसांनी गुजरात सिमेवर शेतकरी आसुड याञा दीड तास अडविली.दरम्यान गुजरात पोलिस मोठा फौजफाटा घेवून रस्त्यावर दाखल झाले.बारडोली येथे गुजरातच्या शेतकऱ्यांनी जेवणाची व्यवस्था केली होती.माञ तिकडे जाण्यास पोलिसांनी मनाई केली.टोलनाक्याशेजारील शेतात सर्व शेतकरी एकञ जमले असतानाच पोलिसांनी धरपकड सुरु केली.जेवण टोलनाक्यावर आलेले असतानाच पोलिसांनी प्रहारचे आ.बच्चू कडू,देवेंद्र गोडबोले,शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील,कालिदास आपेट,दिनकर दाभाडे यांना अटक केली.
 
आ.बच्चू कडूंना ताब्यात घेताच प्रहार शेतकरी संघटनेच्या सुरेखा ढवळे यांनी सहकाऱ्यांसह पोलिस कारवाईला विरोध केला.त्यावेळी पोलिसांनी अपंग महिलांनाही ओढत आणून गाडीत कोबले.कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करुन पोलिस व्हॅनमध्ये घातले.नरेंद्र मोदी यांचे गाव वडनगर येथे रक्तदानाला गुजरात सरकारने परवानगी नाकारल्याचे पोलिसांनी सांगितले.वेगवेगळ्या पोलिस व्हनमधुन महाराष्ट्र,गुजरातमधिल सुमारे 500 महिला,पुरुष,अपंग कार्यकर्त्यांना अटक करुन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात ठेवले आहे.
कालिदास आपेट 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments