Dharma Sangrah

पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी भरली

Webdunia
बुधवार, 24 जानेवारी 2024 (09:54 IST)
उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. रात्रीच्या तापमानात प्रचंड घसरण झाल्याने जळगावकरांना हुडहुडी भरली आहे. २२ जानेवारी रोजी जळगावात किमान तापमानाचा पारा ९ अंशावर तर कमाल तापमानाचा पारा २९ अंश सेल्सिअस होता. तर आज मंगळवारी रात्री तापमानाचा पारा ८ अंशावर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
 
सध्या अंशतः ढगाळ हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे. यात धुळ्याचा पारा यंदाच्या हंगामातील नीचांकी पातळीवर पोहोचली असून ६.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. आतापर्यंतच्या तापमानातील सर्वात नीचांकी तापमानाची म्हणून नोंद करण्यात आली आहे.
 
जळगावात मागील काही दिवसापासून किमान तापमानाचा पारा १० अंशावर होता. रात्री आणि पहाटच्या वेळी थंडीचा जाणवत होती. मात्र सोमवारी ९ अंशावर आल्याने हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत होती. आज रात्री पारा ८ अंशावर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच दिवसाचे तापमान ३० अंशावर असणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
 
२८ जानेवारीपर्यंत हा पारा ३० ते ३१ अंशावर असणार आहे. सध्या पहाटच्या वेळेस जळगाव शहरात सर्वत्र धुक्याची चादर बघायला मिळाली. त्यामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांच्या संख्येमध्ये देखील घट होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान, सध्या थंडीचा रब्बी हंगामातील पिकांना या मोठा फायदा होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments