suvichar

जळगाव जिल्ह्यात कोरोना समूह संसर्गाला सुरुवात

Webdunia
रविवार, 31 मे 2020 (11:13 IST)
जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. सद्यस्थितीत जळगावात 635 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या दोन महिन्यात 73 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशात कोरोना बळींचा मृत्यूदर 2.87 टक्के आहे. तर जळगावात कोरोना बळींचा मृत्यूदर हा सर्वाधिक 11.49 टक्के आहे. 
 
देशाच्या तुलनेत जळगावचा मृत्यूदर हा चौपट आहे. जळगावातील भुसावळमध्ये सर्वाधिक 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर त्या खालोखाल अमळनेर 13 आणि जळगाव 11 जणांचे मृत्यू झाला आहे. रावेरमध्येही 11 कोरोनाबाधितांपैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर 11.49 टक्के असला तरी प्रयोगशाळा कार्यान्वित झाल्याने तपासणीची संख्या वाढेल. त्यामुळे रुग्णांचे निदान वाढेल आणि मृत्यूदरही आपोआपच कमी होईल. त्याशिवाय अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत यापूर्वी जिल्ह्यातील तपासणीचा आकडा कमी आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments