Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातील कोरोनामुक्त गाव स्पर्धा,50 लाखाचं प्रथम बक्षीस देण्यात येईल -हसन मुश्रीफ

Webdunia
बुधवार, 2 जून 2021 (18:28 IST)
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कोरोनामुक्त गाव,तालुका,जिल्हा,आणि अवघे महाराष्ट्र व्हावे या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत आहे ही घोषणा ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.या साठी चांगल्या कामगिरी करणाऱ्या पहिल्या ग्राम पंचायत ला 50 लाख रुपये,दुसऱ्याला 25 लाख रुपये,आणि तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या ग्राम पंचायत ला 15 लाख रुपये बक्षिसे देण्यात येतील.6 महसुली विभागात प्रत्येकी 3 प्रमाणे राज्यात एकूण 18 बक्षीसे दिली जाणार. यासाठी बक्षीसाची एकूण रक्कम 5 कोटी 40 लाख रुपये असेल.
जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही कोरोना मुक्त गावाचे गौरव करण्यात आले होते.त्या उपक्रमाला अधिक चालना मिळावी आणि जास्तीत जास्त गाव ,तालुके,जिल्हे कोरोनामुक्त व्हावे या अनुषंगाने या स्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 3 ग्रामपंचायतींना लेखाशिर्ष -2515 व 3054 या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या 3 ग्राम पंचायतींना अनुक्रमे 50 लाख रुपये, 25 लाख रुपये व15 लाख रुपये इतक्या निधीची विकास कामे मंजुर करण्यात येणार.

या स्पर्धेचे गुणांकन सहभागी गावाचे विविध 22 निकषांवर करण्यात येण्याचे असून या संदर्भात शासन सविस्तर निर्णय आज जारी  करण्याचे सांगण्यात आले.
या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपल्या गावाला कोरोनामुक्त करावे आणि बक्षीस जिंकावे असे आवाहन ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

लोकसभेमध्ये राहुल गांधींना मिळाली मोठी जवाबदारी, शरद पवार म्हणाले, 'भारत जोड़ो यात्रा मुळे...'

छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या धर्माच्या महिलेसोबत बोलत होता तरुण, लोकांनी केली मारहाण

राहुल गांधींच्या लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष बनण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई उच्च न्यायालयाने राणा दंपतीला दण्ड देण्याचा इशारा दिला

सर्व पहा

नवीन

जायकवाडी मासेमारी : 'अपंग मुलाच्या इलाजासाठी रुपया-रुपया साठवते, मासे कमी झाले तर जगू कसं?'

राजर्षी शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी दिलेलं 50 टक्के आरक्षण नेमकं कसं होतं?

छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?

हा भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्ध पहिला T20I सामना खेळणार आहे!

अजित पवार गटाच्या नेत्यांना पक्षामध्ये सहभागी करण्यासाठी काही अटी राहतील-शरद पवार

पुढील लेख
Show comments