Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनपाचा प्लास्टिक विक्रेत्यांना दणका,५ लाखांचा दंड वसूल

Webdunia
शुक्रवार, 30 जुलै 2021 (08:17 IST)
राज्यात प्लास्टिक बंदी मोहिम राबविली जात असली तरी अनेक ठिकाणी सर्रास पद्धतीने प्लास्टिक विक्री केली जात असल्याचे दिसून येतेय.दरम्यान,जळगाव शहरात देखील अनेक विक्रत्यांकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. अशा प्लास्टिक विक्रेत्यांवर जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दंडात्मक कारवाई करत गेल्या सहा महिन्यात २६७ जणांवर दंडात्मक कारवाई करत एकूण ४ लाख ७५ हजार ६२० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
 
जळगाव मनपाच्या आरोग्य विभागातर्फे नुकतीच एका प्लास्टिकच्या होलसेल दुकानावर मोठी कारवाई करत तिथून तीन ट्रॅक्टर भरून प्लास्टिक जप्त करण्यात आले. मनपाने केलेल्या या कारवाईमुळे शहरात रितू प्लास्टिक विकण्यासाठी धजावत आहेत.प्लास्टिक वर महापालिकेने कारवाई केली यानंतर नागरिक धजावले ही गोष्ट जरी खरी असली तरी नागरिकांनी ही गोष्ट ध्यानी धरायला हवी की,प्लास्टिकमुळे निसर्गाची मोठी हानी होत आहे व त्यासाठी आपण प्लास्टिक वापरायला नको.
 
शासनाने प्लास्टिक बंदी लागू केली असली तरी शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये तसेच चिल्लर विक्रत्यांकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा सर्व गैरमार्गाने सुरू आहे. प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यापासून अद्यापपर्यंत तरी शंभर टक्के बंदी झाल्याचे चित्र गैरमार्गाने होत असलेल्या वापरावरून स्पष्ट होते. अनेकदा भाजीविक्रेते व अन्य व्यवसायिकांकडे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे चित्र शहराच्या विविध भागांत दिसून येत आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments