suvichar

आता स्वयंचलित पिंजरा, वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपता येणार

Webdunia
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019 (11:34 IST)
चंद्रपूर जिल्ह्यतील एका पशुवैद्यक अधिकाऱ्याच्या संकल्पनेतून आणि वनाधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे रिमोटच्या सहाय्याने हाताळला जाणारा स्वयंचलित पिंजरा तयार करण्यात आला आहे.
 
अत्याधुनिक असा हा पिंजरा ३० फूट अंतरावर बसूनही रिमोटच्या सहाय्याने संचालित करता येतो. पिंजऱ्यातील यंत्रणेत नेटवर्क असणाऱ्या भ्रमणध्वनी कंपनीचे सिमकार्ड टाकायचे. ही यंत्रणा हाताळण्यासाठी असणारा अ‍ॅप संबंधित वनाधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनीत राहील. पिंजऱ्याच्या आत तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे रात्रीदेखील काम करतील. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पिंजऱ्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपता येतील. विशेष म्हणजे, वाघांच्या अंगावरील पट्टे यामुळे तपासता येतील. त्यासाठी वारंवार पिंजऱ्याच्या जवळ जाण्याची गरज नाही. त्यात आता पुन्हा अत्याधुनिक सेन्सर लावण्यात येणार आहे. ज्यामुळे वन्यप्राणी आता गेल्यानंतर तो आपोआप बंदिस्त होईल. पिंजऱ्याच्या खालच्या बाजूला एक सेन्सर लावण्यात येणार असून या माध्यमातून त्या प्राण्याचे वजन कळेल. याआधी वन्यप्राण्याचे वजन करण्यासाठी त्याला बेशुद्ध करावे लागत होते. चौथा अधिकचा कॅमेरा पिंजऱ्याच्या बाहेर  लावण्यात आला आहे. त्याला ३० फु टाची वायर आहे. ज्यामुळे पिंजऱ्यातील वन्यप्राणी जंगलात सोडताना दुरूनच चित्रीकरण होईल. सौर पॅनलवर आधारित पिंजऱ्याला एक बॅटरीही देण्यात आली आहे. चार्ज करून ठेवलेली ही बॅटरी किमान १८ तास पिंजरा संचालित करू शकेल. त्यामुळे पावसाळ्यात अडचण येणार नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: खडकवासला-फुरसुंगी बोगदा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा

विक्रेत्यांकडे आता क्यूआर कोड असतील; रेल्वे अवैध फेरीवाल्यांवर कडक कारवाई करणार

"ती एक महिला आहे, तिने जास्त बोलणे योग्य नाही..."राहुल गांधींना 'टपोरी' म्हटल्याबद्दल आदित्य ठाकरेंची कंगनावर टीका

गेटवे ऑफ इंडिया येथे आधुनिक जेट्टी बांधण्याची योजना, मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत माहिती दिली

संतप्त झालेल्या गौतम गंभीरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली; हे आहे कारण.....

पुढील लेख
Show comments