Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रायगड जिल्ह्यात २ हजार २५४ जणांना निवारा शेड मध्ये हलविले

Webdunia
सोमवार, 17 मे 2021 (07:33 IST)
अरबी समुद्रात घोंगावत असलेले चक्रीवादळ सोमवारी पहाटे रायगड किनारपट्टीवरून पुढे सरकरण्याची शक्यता आहे. यावेळी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाप्रशासनाने किनारपट्टीवरील भागात कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यास सुरवात केली आहे. रायगड जिल्ह्यात २ हजार २५४ जणांना निवारा शेड मध्ये हलविण्यात आले होते.
 
या चक्रीवादळाचा तडाखा प्रामुख्याने अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण तालुक्यांना बसण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन समुद्र किनाऱ्यावरी ६२ तर खाडी किनाऱ्यावरील १२८ गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. सोमवारी पहाटेपासून रायगड पासून रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील भागात वादळाचा प्रभाव दिसण्यास सुरवात होईल. किनारपट्टीवरील भागात वादळी वारे वाहतील, काही ठिकाणी मुसळधार पाऊसही होईल. समुद्र खवळलेला असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments