Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोकणात येणार चक्रीवादळ: बदलते हवामान याचा हापूस आंबा पिकावर मोठया प्रमाणात परिणाम

Webdunia
गुरूवार, 24 मार्च 2022 (15:15 IST)
बंगालच्या उपसागरात आसानी चक्रीवादळ  निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून, याचा परिणाम आता महाराष्ट्रात  दिसू लागला आहे. चक्रीवादळ पूर्वीच, कोकणात  मोठ्या प्रमाणात गेले काही दिवस ढगाळ वातावरण पसरल्याने आंबा पिकांवर मोहर करपा व फळगळ सारखी समस्यां निर्माण झाली आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक फुकट जाण्याची भीती बागायतदार शेतकरी व्यक्त करीत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, गुहागर, चिपळूण ,खेड ,राजापूर, या परिसरात गेले काही दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे सूर्याचं दर्शन होत  नसल्याने आंबा  बागायतदार चिंतेत आहेत. गेल्या 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने आंब्यावरील मोहोर काळवंडला असून, फळगळ सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे आंब्याच्  पीक यावर्षी फुकट जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
 
कोकणात वारंवार येणारे चक्रीवादळ व  बदलते हवामान याचा हापूस आंबा पिकावर मोठया प्रमाणात परिणाम होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. परंतु शेतकऱ्यांना मात्र ,सरकारकडून दिलासा मिळत नाही, त्यामुळे कोकणी शेतकरी  नेहमीच संकटात सापडला आहे.

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments