Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लातूर जिह्यात पीक खराब झाल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Webdunia
मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (08:57 IST)
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील एका24 वर्षीय कर्जबाजारी शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे पीक खराब झाल्यामुळे बंधाऱ्यात उडी मारून आत्महत्या केली. पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
 
ही घटना शिरूर अनंतपाळ तालुक्याच्या डोंगरगाव गावात घडली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अजित विक्रम बान असे या मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
 
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या शेतकऱ्याकडे चार एकर जमीन होती, मात्र, मराठवाड्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी नैराश्यात  होता. त्यांनी बियाणे घेण्यासाठी हजारो रुपये खर्च केले होते आणि बँकांकडून आठ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने जिल्हा अधिकारी आणि स्थानिक राजकारण्यांना पत्र लिहून त्याच्या नुकसान झालेल्या पिकाची भरपाई देण्याची मागणी केली होती, कारण त्याला फक्त 7,000 रुपये मदत मिळाली होती.
 
त्याने बंधाऱ्यात उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .अजितच्या पश्चात त्याच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी आणि दीड वर्षाची मुलगी आहे.या घटनेमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments