Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता पाडणारच,नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका

Webdunia
मंगळवार, 26 डिसेंबर 2023 (08:25 IST)
पुणे : एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला, नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. तर त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार निवडून आणणारच असं म्हणत अजित पवारांनी थेट दंडही थोपटले आहेत. तसेच, शिरुर लोकसभा मतदारसंघाचेखासदार अमोल कोल्हेंवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता टीका केली आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचे रान केले. तसेच आता आम्ही त्यांच्याविरोधात उमेदवार दिला तर आम्ही तो उमेदवार निवडून आणणारच, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
 
ज्यांना माझ्यासोबत यायचे आहे, त्यांनी माझ्यासोबतच यावे, ज्यांना दुस-या बाजुला जायचे आहे, त्यांनी तिकडे जावे, माझ्या बाजूनं म्हणजे काय हुकुमशाही आहे का? ज्यांनी माझी बाजू घेतली, त्यांनी दुटप्पी भूमिका घेऊ नका, मेहरबानी करा, खरे जे बोलतो तेच सांगा., असे अजित पवार म्हणाले. अनेक कार्यकर्ते अजुनही दोन्ही बाजूंनी दिसतात, असे विचारताच अजित पवार म्हणाले की, असू द्यात ना, मी सांगायचे काम केले आहे, बघु काय फरक दिसतोय का? माझ्या दृष्टीने जे योग्य वाटते, ती भूमिका घेण्याची मला मुभा आहे, मला इतरांनी टोकण्याचे कारण नाही.
 
एका खासदाराने जर आपल्या मतदारसंघात लक्ष दिले असते, तर खूप बरे झाले असते. एक खासदार एक ते दीड वर्षापूर्वी मला राजीनामा द्यायचा आहे. त्या खासदाराला उमेदवारी मी दिली आहे. त्या खासदाराला निवडणून आणण्यासाठी जीवाचे रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केले आहे.

Edited By-Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

गुजरातमध्ये 4 ISIS दहशतवाद्यांना अटक, ATS तपासात गुंतली

छत्तीसगडच्या कवर्धामध्ये पिकअप दरीत कोसळली, 18 मजुरांचा मृत्यू

12वीचा निकाल उद्या लागणार

IPL 2024: पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादचा सामना कोलकाताशी

स्मृति इराणी यांनी गौरीगंजमध्ये केले मतदान, विकसित भारत संकल्प आणि महिला कल्याणासाठी टाकले मत

समुद्रात संपले नावेचे इंधन, भारतीय तटरक्षक दलाने वाचवले 26 लोकांचे प्राण

नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र

या दिवशी महाराष्ट्रात आणि मुंबईत होणार Monsoon ची एन्ट्री, जाणून घ्या मोठे अपडेट

पुढील लेख
Show comments