rashifal-2026

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे प्रशासनाला आदेश, दुष्काळ पाहणीसाठी सचिवांनो आपल्या जिल्ह्याचा दौरा करा

Webdunia
सोमवार, 13 मे 2019 (09:44 IST)
राज्यात दुष्काळ निवारणासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि टंचाई आराखड्याच्या नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्याचे दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबतचे अहवाल येत्या २१ मे पर्यंत सादर करण्याचे आदेशही पालक सचिवांना देण्यात आले आहेत.
 
राज्यातील यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन त्याचे निवारण करण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. दुष्काळी कामांचे नियोजन, मदतीची आवश्यकता, कामांची अंमलबजावणी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्‍हानिहाय बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणा व पदाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देत आहेत.
 
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी व टंचाई आराखड्याचे नियोजन यांची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्यात भेट देऊन तपशीलवार आढावा घ्यावा, त्याचा सविस्तर अहवाल मुख्य सचिवांमार्फत २१ मे २०१९ पर्यंत सादर करावा, असे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

भाजपा ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी पक्ष सदस्यत्व आणि पदाचा राजीनामा दिला

LIVE: पुणे-पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, युतीची अजित पवारांची मोठी घोषणा

टाटा ओपन गोल्फ: टाटा ओपनमध्ये जगलान आणि संधू यांची संयुक्त आघाडी

भारताने नूर खान एअरबेसवर मोठा हल्ला केला..., पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची मोठी कबुली

पुढील लेख
Show comments