Marathi Biodata Maker

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे प्रशासनाला आदेश, दुष्काळ पाहणीसाठी सचिवांनो आपल्या जिल्ह्याचा दौरा करा

Webdunia
सोमवार, 13 मे 2019 (09:44 IST)
राज्यात दुष्काळ निवारणासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि टंचाई आराखड्याच्या नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्याचे दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबतचे अहवाल येत्या २१ मे पर्यंत सादर करण्याचे आदेशही पालक सचिवांना देण्यात आले आहेत.
 
राज्यातील यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन त्याचे निवारण करण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. दुष्काळी कामांचे नियोजन, मदतीची आवश्यकता, कामांची अंमलबजावणी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्‍हानिहाय बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणा व पदाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देत आहेत.
 
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी व टंचाई आराखड्याचे नियोजन यांची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्यात भेट देऊन तपशीलवार आढावा घ्यावा, त्याचा सविस्तर अहवाल मुख्य सचिवांमार्फत २१ मे २०१९ पर्यंत सादर करावा, असे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीस सरकारने शिंदे यांचे ११ तलाव प्रकल्प थांबवले

अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात पाकिस्तानचा हवाई हल्ला; सात जण ठार

IND vs PAK Hockey: भारत सामन्यापूर्वी पाकिस्तान हॉकी संघ नाराज; खेळाडूंनी संताप आणि नाराजी व्यक्त केली

Team India Schedule: भारतीय संघ मे महिन्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे, संपूर्ण वेळापत्रक पहा

डिजिटल अटक घोटाळ्याविरोधात मोठी कारवाई, ९,४०० व्हॉट्सॲप खाती ब्लॉक, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात खुलासा केला

पुढील लेख
Show comments