Marathi Biodata Maker

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे प्रशासनाला आदेश, दुष्काळ पाहणीसाठी सचिवांनो आपल्या जिल्ह्याचा दौरा करा

Webdunia
सोमवार, 13 मे 2019 (09:44 IST)
राज्यात दुष्काळ निवारणासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि टंचाई आराखड्याच्या नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्याचे दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबतचे अहवाल येत्या २१ मे पर्यंत सादर करण्याचे आदेशही पालक सचिवांना देण्यात आले आहेत.
 
राज्यातील यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन त्याचे निवारण करण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. दुष्काळी कामांचे नियोजन, मदतीची आवश्यकता, कामांची अंमलबजावणी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्‍हानिहाय बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणा व पदाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देत आहेत.
 
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी व टंचाई आराखड्याचे नियोजन यांची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्यात भेट देऊन तपशीलवार आढावा घ्यावा, त्याचा सविस्तर अहवाल मुख्य सचिवांमार्फत २१ मे २०१९ पर्यंत सादर करावा, असे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

14 मार्च रोजी मसुरीमध्ये कुलदीप वंशिकासोबत लग्न करणार

एअर इंडियाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान भाड्यात वाढ केली

LIVE: नागपुरात धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्याचे आदेश

मुक्ताईनगर जमीन अधिग्रहण प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांची चौकशी होणार, एसआयटी स्थापन

'इराणसोबतचे युद्ध मी जेव्हा इच्छितो तेव्हा संपेल', अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे मोठे विधान

पुढील लेख
Show comments