rashifal-2026

मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाच्या उंबरठ्यावर

Webdunia
बुधवार, 16 ऑगस्ट 2017 (09:23 IST)
मराठवाड्यात पावसाने पेरणापुर्वी वेळेत दमदार हजेरी लावल्याने आनंदी झालेल्या बळीराजाने बिकट आर्थिक परिस्थिती असतानाही खरिपाचा अक्षरशः जुगार खेळला. त्याने उसणवारी करत पेरणी केली. मात्र पावसाने दिड-दोन महिन्यापासून दांडी मारल्याने पिके जळू लागली आहेत. खरीपाचा हा जुगार हरलेल्या शेतकऱ्यांना पाणावलेल्या डोळ्यांनी पिकांवर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. मात्र, विधानसभा-लोकसभेत वेगवेगळ्या विषयावर रणकंदन माजवले जात असताना हतबल झालेल्या शेतकऱ्यांविषयी कोणताही लोकप्रतिनिधी बोलताना दिसत नाही.
 
गेली 4 वर्ष दुष्काळ सहन करत घर सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना नापिकीने, कधी अवकाळीने, कधी गारपिटीने तर कधी अतिवृष्टीने मारले आहे. डोक्‍यावर असलेले कर्ज आणि खांद्यावर असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी धीर धरून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता नविन संकट उभे राहिले आहे. हवामान खात्याच्या खोटारडे अंदाजावर विश्‍वास ठेवत शेतकऱ्यांनी दिरवेगार स्वप्न पाहिले. मात्र, मागील दिड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने हि हिरवी स्वप्ने आता करपू लागली आहेत. खरीपाची पिके पाण्याअभावी वाळत असताना नांगर फिरवण्याशिवाय मार्ग दुसरा नसल्याचे शेतकरी वर्गात बालले जात आहे. मात्र, अशा परिस्थितीमध्येही वेगवेगळ्या विषयांवर विधानसभेत आणि लोकसभेत रणकंदन माजले असताना हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर पोटतिडकीने कोणताही लोकप्रतिनिधी बोलताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अस्मानीसोबतच सुलतानी मार सहन करण्याची वेळ आली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

यवतमाळमध्ये बेपत्ता 6 वर्षाच्या मुलीचा मृतदेह पोत्यात आढळला, आरोपी ताब्यात

LIVE: फडणवीस सरकारने धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६ मंजूर केला

अशोक खरात यांच्या अडचणी वाढल्या,100 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले

गॅस संकटामुळे मुंबईतील हॉटेल उद्योग अडचणीत, इंडक्शन स्टोव्हची मागणी ३० पटीने वाढली

मालाडमध्ये मुलींवर झालेल्या हल्ल्यानंतर तणाव वाढला, आरोपींच्या अटकेची मागणी तीव्र

पुढील लेख
Show comments