Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची वडोदरात भेट, महाराष्ट्रात सरकार स्थापनेची भाजपची तयारी!

Webdunia
शनिवार, 25 जून 2022 (19:41 IST)
maharashtra political crisis: काल रात्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वडोदरा येथे बैठक झाल्याचे सूत्रांकडून वृत्त मिळत आहे. रात्री दोन ते पहाटे चार या वेळेत दोघांची भेट झाली. या सभेसाठी फडणवीस इंदूरहून दिल्ली आणि नंतर वडोदरा येथे रवाना झाले होते. ही माहिती समोर आल्यानंतर शिंदे गट भाजपला कधीही पाठिंबा देऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेनेच्या 38 बंडखोर आमदारांसह आसाममधील गुवाहाटी येथे तळ ठोकून बसलेल्या एकनाथ शिंदे यांनी गुजरातमध्ये जाऊन वडोदरा येथे भाजप नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सूत्रांकडून समजते.देवेंद्र फडणवीस रात्री 10.30 वाजता सभेसाठी मुंबईहून निघाल्याची माहिती समोर आली आहे. 
 
दोन्ही नेते चार्टर प्लेनने वडोदरा येथे पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.एकनाथ शिंदे गुवाहाटीहून वडोदराकडे रवाना झाले.तर फडणवीस रात्री 10.30 वाजता मुंबईहून निघाले.रात्री दोन वाजता दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली.दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाल्याचेही समोर येत आहे. त्यांच्यात काय चर्चा झाली अद्याप समजू शकले नाही. 
 
तर दुसरीकडे शिवसेनेनेही शिंदे गटावर कारवाईची तयारी चालवली आहे.शिंदे यांच्यासह16 बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिवसेनेची विनंती उपसभापतींनी मान्य करत, शिंदे गटाला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत दिली आहे.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments