suvichar

शेतकरी संपामुळे लासलगाव बाजार समितीत शेतमालाची आवक घटली

Webdunia
शेतकरी वर्गाने पुकारलेल्या संपाचा मोठा फटका देशातील नव्हे तर आशियातील सर्वात मोठी कांदा बाजार पेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीला बसला आहे. कोणताही माल विक्री करायचा नाही म्हणून अनेकांनी माल विक्रीस आणलाच नाही, त्यामुळे उलाढाल ठप्प झाली आहे.

शेतकरी संपाला गेल्यावर्षी एक जून पासून सुरू झालेल्या संपानंतरही शेतकऱ्यांचे प्रश्न अद्याप सुटलेले नसल्याने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.आजपासून सुरू असलेल्या शेतकरी संपामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज दिवसभरात फक्त ९ वाहने लीलावास आली.संपूर्ण बाजार आवार हा ओस पडलेला होता.लासलगाव मधील सर्व अर्थकारण हे या बाजार समितीवरच अवलंबून असल्याने संपूर्ण लासलगाव मध्ये संपाच्या पहिल्या दिवशिच परिणाम जाणवू लागलेला आहे.

शेतकरी संपामुळे कांदा,भाजीपाला,धान्य यांच्या आवकेवर फटका बसल्याचे दिसून आले.तर दुसरीकडे ग्रामीण अर्थकारण संकटात सापडलं आहे. शेतकरी संपामुळे आशियातली सर्वात मोठी कांदा बाजार समिती असलेली लासलगाव बाजार समिती ओस पडली आहे. दररोज होणारी १५ ते २० हजार क्विंटल कांद्याची आवक आणि दोन ते अडीच कोटी करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.संपूर्ण कर्जमाफी व शेतमालास उत्पादन खर्चासह ५० टक्के हमीभावासह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी राज्यात संप पुकारला होता. या संदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनांची वर्षभरानंतरही पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या, यासाठी काल पासून (शुक्रवार) दहा दिवस शेतकरी संप पुकारला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपुरतील महावितरण वीज यंत्रणा बळकट करणार

नीट पेपरफुटीमागील मुख्य सूत्रधारला पी. व्ही. कुलकर्णी याला पुण्यातून अटक

आषाढी वारीसाठी अहिल्यानगर प्रशासन सतर्क,जिल्हा प्रशासनाने मोठी तयारी केली

अमरावती जिल्ह्यात रस्ते अपघातग्रस्तांसाठी पंतप्रधान मदत योजना राबविण्यात आली, १.५ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार मोफत देणार

विदर्भात १५ जूनपासून शाळा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान, शिक्षण विभागाला नोटीस बजावली

पुढील लेख
Show comments