Festival Posters

शिक्षणमंत्री कोचिंग क्लासेसकडून देवाणघेवाण करतात माजी मंत्री अनिल देशमुख यांचा गंभीर आरोप

Webdunia
मंगळवार, 28 मे 2019 (09:18 IST)
सूरतमध्ये कोचिंग क्लासमध्ये झालेल्या अग्नीतांडवात २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीलर आलाय. महाराष्ट्रात आज जवळपास १ लाख ते १ लाख १० हजार कोचिंग क्लासेस आहेत. मुंबईतील ३०-४० हजार क्लासेसमध्ये फायर ऑडिट व्हायला हवे. कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही, बेसमेंटमध्ये क्लास भरवले जातात, असा क्लासेस वर निर्बंध घातले गेले पाहिजेत, असे मत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. याबाबत कायदा केला जाणार होता, मात्र तो अद्यापही झालेला नाही. २०१७ मध्ये यासंदर्भात समिती गठीत केली होती. १२ सदस्यांच्या तज्ज्ञ समितीने अहवाल सादर केला. कायद्याचा मसुदा तयार आहे, मात्र हा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे या गंभीर प्रश्नाबाबत लक्ष का घालत नाहीत? असा प्रश्नही देशमुख यांनी उपस्थित केला. शिक्षणमंत्र्यांची कोचिंग क्लासेस चालवणाऱ्यांकडून देवाणघेवाण झाली आहे, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केलाय. तावडे याबाबत लक्ष घालणार नसतील तर मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, पण विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको, अशी मागणीही देशमुख यांनी केली.
 
यावेळी मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, प्रवक्ते संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो, महेश चव्हाण उपस्थित होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंसाठी पुढील लक्ष्य आता आयपीएल २०२६ असेल

LPG cylinder crisis : सिलिंडर उपलब्ध नसल्याने मुंबई मधील रेस्टॉरंट्स आणि पुण्यात १८ स्मशानभूमी बंद करण्यात आल्या

संजय शिरसाट यांच्या विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप, अविनाश जाधव यांनी फडणवीस यांना पत्र लिहले

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा मुंबईत पोहचले; आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्याने एक मोठा निर्णय घेत नवीन ऑटो-रिक्षा परवाने देणे तात्पुरते थांबवले

पुढील लेख
Show comments