Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजकीय इच्छाशक्ती अभावी सीमाप्रश्न प्रलंबित माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची खंत

Webdunia
शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (08:47 IST)
Photo-Social Mediaसीमा भागातील नागरिकांवर होणारा अन्याय दूर करून कर्नाटकातील सीमाभाग महाराष्ट्रात आणला गेला पाहिजे. अलीकडच्या राजकारण्यांना सीमाप्रश्नाचे फारसे महत्त्व वाटत नाही. राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्यामुळे सीमाप्रश्न अद्यापही प्रलंबित आहे, असे मत माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.
 
 साथी किशोर पवार प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा ‘साथी किशोर पवार ‘आधारवड’ पुरस्कार’ न्यायमूर्ती चपळगावकर यांना, ‘साथी किशोर पवार ‘नवचेतना’ पुरस्कार चेतना सिन्हा यांना, ‘गुणवंत कामगार पुरस्कार’ बाबुलाल शाबू पठाण यांना एस. एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जी. जी. पारेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी चपळगावकर बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, साथी किशोर पवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण ठाकुर, उपाध्यक्ष अंकुश काकडे, सचिव वंदना पवार उपस्थित होत्या.
 
चपळगावकर म्हणाले, सीमाप्रश्न इतक्या वर्षांपासून प्रलंबित राहणे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सध्याच्या घडीला सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments