Festival Posters

करारा जबाब मिलेगा! राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी मनसे आक्रमक

Webdunia
शनिवार, 9 एप्रिल 2022 (17:15 IST)
येत्या 12 एप्रिल रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात सभा होणार असून या सभेपूर्वी अनेक घडामोडी मनसेत घडल्याने 12 एप्रिल रोजी होणाऱ्या या सभेत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार या कडे सर्वांचं लक्ष वेधत आहे. या पूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी मुंबईत झालेल्या सभेत मशिदीवरून भोंगे उतरवण्याबाबत वक्तव्य दिले होते. त्याचे राजकीय पडसाद देखील उमटताना दिसून आले. आता या सभेत राज ठाकरे काय बोलणार याचा कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 12 एप्रिल रोजी ठाण्यात होणाऱ्या या सभेसाठी मनसेने जय्यत तयारी सुरु केली आहे. या सभेपूर्वी मनसेकडून एक टिझर देखील रिलीझ करण्यात आलं आहे. या टिझर मधून सर्व टीकांना करार जबाब राज ठाकरे देण्याचं सांगितले आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. 

<

करारा जवाब मिलेगा#उत्तरसभा pic.twitter.com/KwXm9mbsKM

— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 9, 2022 >या मनसेच्या टिझर मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार,शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रया दाखविण्यात आल्या आहेत.  
 आता महापालिका निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असून त्यापूर्वी मनसे आक्रमक झाली आहे. या पूर्वी मनसे नेते अमेय खोपकर यांनी देखील 12 तारखेच्या सभे संबधी ट्विट केले होते. त्यात त्यांनी शिवतीर्थावरील सभेने तुमची झोप उडाली आता ठाण्यात  12 तारखेच्या उत्तरासभे नंतर तुमचं काय होईल ?  आता या 12 एप्रिल रोजी ठाण्यात राज ठाकरे काय म्हणतात हे जाणून घेण्याकडे सम्पूर्ण राज्याला उत्सुकता लागली आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments