Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोव्यातही धरणे ८० टक्क्यांवर…

Webdunia
सोमवार, 24 जुलै 2017 (08:27 IST)
राज्यात मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे बहुतेक सर्व महत्त्वाच्या  धरणांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन ती ८० टक्के भरली आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत धरणे ओसंडून वाहू लागतील,  अशी माहिती जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
 
धरणांच्या पातळीत वाढ झाल्याने तसेच पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे सिंचनात कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांनाना आवश्यक ते सहकार्य  देण्यास जलस्रोत खाते नेहमीच तत्पर राहील,  असेही पत्रकात म्हटले आहे.
 
आकडेवारीनुसार राज्यातील साळावली,  अंजुणे,  आमठणे, चापोली व पंचवाडी या पाच महत्त्वाच्या धरणांमधील पाण्याच्या पातळीत मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे वाढ झाली आहे. या धरणांच्या पाण्याची पातळी वाढून ती 80 टक्क्यांहून अधिक झाली आहे. साळावली धरणाची क्षमता 41.15 मीटर इतकी असून 21 जुलै रोजी 40.24  मीटर  पर्यंत धरण भरल्याची नोंद  झाली आहे. गेल्यावर्षी याच दिवशी साळावली धरणाची ही पातळी 40.57 मीटर इतकी नोंद झाली होती.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments