Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पूरबाधित कुटुंबांना आणखी तीन महिने धान्य मोफत

Webdunia
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019 (16:31 IST)
निवारा केंद्रात असलेले पूरग्रस्त लोक आता परत आपापल्या घरी परतत आहेत. शासनाच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबांना मोफत धान्य वाटपही सुरू केले आहे. तसेच पूरबाधित कुटुंबांना आणखी तीन महिने धान्य मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे निवारा केंद्रांची संख्या कमी होऊ लागली आहे. रविवार अखेर पूरग्रस्तांना १९ कोटी ७८ लाख २० हजार इतक्या रकमेचे वाटप करण्यात आले आहे. पूरग्रस्त ४७४ गावांतील ९४ हजार २७४ एवढी पूरग्रस्त कुटुंबांची संख्या आहे.
 
रविवार अखेर ४१ हजार ४९५ कुटुंबांना गहू व तांदूळ प्रत्येकी दहा किलो याप्रमाणे ८२९.९० मेट्रिक टन धान्याचे वाटप करण्यात आले आहे. धान्य वाटपाच्या कालावधीत बदल केला असून पूरबाधित कुटुंबांना आणखी तीन महिने धान्य मोफत दिले जाणार आहे. त्यामुळे पूरबाधीत कुटूंबांना पुढील काही महिने चिंता करण्याची गरज नाही, असे  चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

ईडीची मोठी कारवाई,सहारा ग्रुपची 1460 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

पुण्यात पतीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या,पत्नीच्या गुप्तांगावर हळद आणि कुंकू लावला आणि लिंबू पिळला

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कोठडीतील अनैसर्गिक मृत्यूंसाठी भरपाई धोरणाला मान्यता दिली

LIVE: महायुती सरकारमध्ये मतभेद, या भाजप नेत्याची पुष्टी

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, दोन मोठ्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुढील लेख
Show comments