ग्राम पंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज लागला असून नंदुरबार तालुक्यातील 75 ग्राम पंचायती पैकी 42 भाजप, 28 शिंदे, 1 राष्ट्रवादी तर 4 अपक्ष लोकनियुक्तांची सरपंचपदी निवड झाली.
नंदुरबार तालुक्यातील 75 ग्रामपंचायतींसाठी निवडणुक प्रक्रिया सुरू होती. त्यात अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर 6 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. शिंदे गटाने सुतार, पाथ्री व वरूळच्या ग्राम पंचायतीवर तर देवपूर, नटावद आणि भवानी पाडाया ग्रामपंचायतीवर भाजपचा विजयी होण्याचा दावा होता. 18 सप्टेंबर रोजी ग्राम पंचायतीसाठी मतदान झाले त्याचा निकाल आज जाहीर झाला असून ६९ ग्रामपंचायतीपैकी 39भाजपा, 25 शिवसेना (शिंदे गट), 4 अपक्ष तर 1 राष्ट्रवादी पक्षाचे लोकनियुक्त सरपंचपदी निवडून आले.
तर अजयपूर, बिलाडी, हरीपूर, पाचोराबारी, खामगांव, टोकरतलाव, विरचक, वाघाळे, आरर्डीतारा, धुळवद, निंबोणी, राजापूर, नंदपूर, वेळावद, भोणे, दुधाळे, दहिंदुले बु., दहिंदुले खु., पिंपरी, नांदर्खे, धमडाई, करजकुपे, लहान शहादा, होळतर्फे हवेली या ग्रामपंचयायतीवर शिंदे गटाचा विजय झाला आहे.
नंदुरबार तालुक्यातील रनाळे खुर्दे, शेजवा, उमज, ठाणेपाडा येथील विजयी उमेदवारांनी अपक्ष निवडून आल्याचे सांगितले तर तालुक्यातील वाघोदा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा विजय झाला.