Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदींकडून देशवासियांचा भ्रमनिरास

Webdunia
शनिवार, 24 मार्च 2018 (11:07 IST)
विमानातील प्रवाशांना योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी कुशल वैमानिकाची आवश्यकता असते. तद्वतच देशाच्या 125 कोटी लोकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी देशाला चांगल्या पंतप्रधानांची गरज आहे. मात्र, देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरल्याची टीका पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी नागपुरात केली. मोदींकडून जनतेचा भ्रमनिरास झाला असून अच्छे दिनची आशा मावळल्याचे ते म्हणाले.
 
अकोला येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी नागपुरात आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. नागपुरात आल्यानंतर प्रथम त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेतले. गेल्या चार वर्षात मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. नरेंद्र मोदींबद्दल लोकांना मोठ्या अपेक्षा होत्या. शेतकर्‍यांना दादुप्पट भाव देऊ, असे आश्वासन दिल्यानंतरही शेतकरी आत्हत्यांध्ये वाढ झाली आहे, असे ते म्हणाले.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments