Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री बदलले का? शरद पवार सरकारच्या घोषणा कधीपासून करू लागले? - चंद्रकांत पाटील

Webdunia
शनिवार, 6 नोव्हेंबर 2021 (10:28 IST)
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे. शरद पवार कधीपासून सरकारच्या घोषणा करू लागले? मुख्यमंत्री बदलले आहेत का? असे सवाल चंद्रकांत पाटलांनी केले आहेत.
 
ऐन सणासुदीच्या काळात होत असलेल्या या संपामुळं प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळं उच्च न्यायालयानंही या संपाची दखल घेत, संप मागं घेण्याचे निर्देश दिले होते. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी माघार घेतली नसल्यानं हा विषय अधिक गंभीर बनला आहे.
 
याबाबत शरद पवार यांनी भाष्य केलं होतं. काही लोकांनी टोकाची भूमिका घेतल्यानं हे घडत आहे, असं पवार म्हणाले होते. न्यायालयानंही संप कायदेशीर नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळं कोर्टाचा आदर करून विषय संपवण्याचं आवाहन पवारांनी केलं आहे.
 
यावर चंद्रकांत पाटलांनी टीका केली. एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची हौस नाही. सरकार अजूनही त्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही, मात्र भाजप ताकदीने त्यांच्या मागे असल्याचं पाटील म्हणाले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments