Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात मुसळधार पावसाचा कहर सुरूच, आतापर्यंत 104 जण पावसाळा बळी पडले

Webdunia
सोमवार, 18 जुलै 2022 (11:23 IST)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाच्या सरी सुरु असून मुसळधार पावसाने कहर केला आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 104 जणांचा मृत्यू झाला असून 189 जनावरांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.
 
महाराष्ट्रात गेल्या 15 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. जुलैमध्ये 15 दिवसांत 392.7 मिमी पावसाची नोंद झाली असून, आता येत्या आठवड्यातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 20 जुलैपर्यंत कोकण आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत रविवार ते मंगळवार या कालावधीत जोरदार वारे आणि वादळी वारे वाहतील, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. 18 जुलै रोजी रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

काही भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. राज्यात 73 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत.आता हवामान विभागाने पावसाबाबत इशारा दिला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढू शकतो, असे विभागाने म्हटले आहे. येत्या तीन दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे भागतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे.
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments