Festival Posters

महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरूच

Webdunia
गुरूवार, 22 जुलै 2021 (08:31 IST)
आगामी पाच ते सहा दिवस मराठवाड्यासह राज्यातील विविध भागात अती पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामध्ये मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याचा समावेश आहे. अती पावसाचा इशारा देण्यासाठी हवामान विभागाच्या वतीने ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात येतो. म्हणजे या भागामध्ये अती पाऊस पडण्याची शक्यता असते.
 
मराठवाड्यात गेल्या महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. मात्र, उशीरा का होईना मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र, आता पुन्हा अती पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. वास्तविक काही दिवसांपूर्वी देखील मराठवाड्यातील काही भागात अती पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
अति पावसाचा इशारा देण्यात आलेल्या जिल्ह्यामध्ये २२ जुलै रोजी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात हवामान विभागाच्या वतीने ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर इतर जिल्ह्यातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच औरंगाबाद विभागात सर्वदूर चांगल्या पावसाची शक्यात वर्तवण्यात आली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

"राहुल गांधी हे देशाच्या राजकारणातील एक नाकारलेली वस्तू," असे मुख्यमंत्री फडणवीस का म्हटले?

LIVE: महाराष्ट्र तीव्र उष्णता आणि जीवघेण्या उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी कारवाई; मुंबई पोलिसांनी सुरक्षा रक्षक श्याम सोनावणे यांना बडतर्फ केले

Update in Nashik TCS case टीसीएस आरोपी निदा खानला न्यायालयाने १४ दिवसांच्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात पाठवले

महाराष्ट्रात भीषण उष्णतेची लाट; विदर्भात ६ जणांचा मृत्यू; प्रशासनाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत घरातच राहण्याचा सल्ला दिला

पुढील लेख
Show comments