Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

''बदला घेण्याचं हिंदुत्व आमचं नाही"- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 Hindutva is not ours for revenge  - Chief Minister Uddhav Thackeray Marathi Regional News  In Webdunia Marathi
Webdunia
रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (17:22 IST)
"तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी आज भेट झाली. देशातलं वातावरण गढूळ होत चाललं आहे. सूडाचं राजकारण खालच्या पातळीवर गेलं आहे. बदला घेण्याचं हिंदुत्व आमचं नाही", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दोन्ही नेत्यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला.
 
मुख्यमंत्री म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांची काल जयंती होती. आमची आज भेट होतेय. आतमध्ये एक, बाहेर वेगळं असं आम्ही करत नाही. बैठकीत लपवण्यासारखं काहीही नाही.
 
देशाचं भवितव्य काय? देशाचा विचार करायला पाहिजे होता. आज नव्याने साक्षात्कार झालेला नाही. संपूर्ण देशात राज्यं शेजारधर्म विसरली आहेत. आम्ही सख्खे शेजारी आहोत. राज्याराज्यात चांगलं वातावरण राहायला हवं. राज्य गेलं खड्यात, देश गेला खड्यात हे परवडणारं नाही. आकारउकार यायला थोडा वेळ लागेल. देशाचे मूलभूत प्रश्नांऐवजी, दुसऱ्याला बदनाम करण्याची व्यवस्था तयार झाली पाहिजे. आम्ही दोघांनी एक दिशा ठरवली आहे. आम्ही त्यानुसार वाटचाल करू".
 
"देशात अन्य काही लोक आहेत जे आमच्याप्रमाणे विचार करतात. काही दिवसातच हैदराबाद इथे पुन्हा चर्चा होईल. मग पुढचा रस्ता स्पष्ट होईल", असं तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्र-तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. 1000 किलोमीटरची सीमा लागून आहे. महाराष्ट्र आमचा मित्र आहे. अनेक गोष्टींमध्ये सहकार्याने काम करावं लागतं. दोन नेते भेटतात त्यावेळी देशाच्या राजकारणासंदर्भात चर्चा होते. देशात परिवर्तनाची गरज आहे. देशातल्या युवा मंडळींना घेऊन काम करायला हवं. देशाचं वातावरण खराब करायला नको. भारताला मजबूत करावं अशी आमची इच्छा आहे. अन्य पक्षांच्या नेत्यांशीही चर्चा करू. लोकशाहीसाठी लढायचं आहे. आमच्या भेटीत जी चर्चा झाली त्याचे सकारात्मक परिणाम. उद्धवजींना हैदराबादचं निमंत्रण देतो. त्यांनी आमचं छान आदरातिथ्य केलं".
 
केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आम्ही याचा निषेध करतो. केंद्राला याचे परिणाम भोगावे लागतील असंही ते म्हणाले.
 
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांची भेट घेतल्यानंतर सांगितले की, "आमच्या बैठकीचा चांगला परिणाम तुम्हाला लवकरच दिसेल. मी उद्धवजींना तेलंगणात येण्याचे निमंत्रण देतो." चंद्रशेखर राव म्हणाले, "केंद्रीय यंत्रणांचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने गैरवापर होत आहे, आम्ही त्याचा निषेध करतो. केंद्र सरकारने आपले धोरण बदलावे, अन्यथा त्यांना त्रास होईल. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत पोहोचल्या, आरबीआयच्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभागी होणार

LIVE: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत पोहोचल्या

सकाळी शुभेच्छा दिल्या संध्याकाळी जीभ घसरली, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले-मी गुढी बिडी सजवत नाही

काश्मीरला मिळाली पहिली वंदे भारत ट्रेन भेट, पंतप्रधान मोदी १९ एप्रिल रोजी हिरवा झेंडा दाखवणार

गॅस गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत दोन अल्पवयीन भावंडांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments